पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना आश्रय दिला : डॉ. शिरीष शितोळे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. शिरीष शितोळे , डॉ. सुरेश संकपाळ , प्रा.हरिदास ढोके , डॉ. श्रीमती व्ही. पी .पाटील , प्रा. जगदीश सरदेसाई , डॉ. एन. डी. मांगोरे , प्रा . दत्तात्रय नाईक व मान्यवर.   कोल्हापूर जिल्हा समृद्ध व निसर्ग रम्य आहे याचे श्रेय कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जाते कारण जिल्ह्यामध्ये राधानगरी सारखे धरण बांधून मुबलक पाण्याची सुविधा निर्माण केली . देशात पहिला जिल्हा असेल जिथं प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहांची स्थापना केली . या सर्व कार्यातून त्यांनी सामाजिक सुधारणा घडवून आणली आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श युवकांनी घ्यावा असे मत यावेळी डॉ. शिरीष शितोळे यांनी मांडले.                 त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना आश्रय दिला . कलेवर असणारे छत्रपती शाहू महाराजांचे प्रेम याबद्दल सांगताना म्हणाले की , चित्रकलेच्या इंटरशीपसाठी अनेक देशातून लोक आजही कोल्हापुरा