डॉ . अल्बर्ट एलिस विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy )

 डॉ . अल्बर्ट एलिस

अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy ) हा त्यांचा मानवी मनाचा सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांच्या लहानपणीच  झाली होती. भावनेच्या आहारी न जाता, तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला. त्यासाठी अनेक उदाहरणे व दाखले दिले आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे सांगता येतील.

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात, तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून पहातो आणि त्या घटनाक्रमांचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो.

२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते, परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते. पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही. म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .

३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे आपण स्वतःच निर्माण करत असतो. जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती आपणास निराश करू शकत नाही. आपण स्वतःच तसे वाटून घेत असतो. यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  आपले आयुष्य न तोलता, आपले यश  हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते. तसेच आपले अपयश हे कुणाचेतरी  यश असू शकते. त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका.

४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे. प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. कोणी काहीही बोलले तरी, जर आपला आपल्या कृतीवर विश्वास असेल तर आपण कायम आनंदी राहू शकतो.

५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आह. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील स्थान, समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर आपले कोणावाचून काहीही अडत नाही. दुसर्यांवर प्रेम जरूर करावे पण त्या आधी स्वतःवर प्रेम करावे.

६)  आपण जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा, संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका. कारण आयुष्य अजून संपलेले नाही.  दुसर्यांच्या चुका तर आपण नेहमीच माफ करतो. कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा. जर आपण स्वतःला स्वीकारले तरच जग आपोआप स्वीकारेल.

७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात. त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा. दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका.

८) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते. अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका. कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार करा. आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी मानसिक संतुलन महत्वाचे असते.

९) दुसऱ्या व्यक्तीच्या  विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर आपला ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने  बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो. परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर आपला ताबाच नाही त्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते, तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते. तसंच  अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता आपण कसे वागायचे हे ठरवावे.

१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो. फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे. हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना आपले स्वतःचेच विचार आड येत असतात. एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते. परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा आपल्याकडे परतत नाही.

११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो. मानसिक नाही, आपण  व्यक्तीवर हक्क सांगतो म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगत असतो. त्याच्या मनावर आणि भावनांवर आपण हक्क सांगू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते.

वरील  नियम कालाबाधित आहेत, म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम !अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy ) हा त्यांचा मानवी मनाचा सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांच्या लहानपणीच  झाली होती. भावनेच्या आहारी न जाता, तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला. त्यासाठी अनेक उदाहरणे व दाखले दिले आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे सांगता येतील.

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात, तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून पहातो आणि त्या घटनाक्रमांचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो.

२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते, परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते. पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही. म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .

३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे आपण स्वतःच निर्माण करत असतो. जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती आपणास निराश करू शकत नाही. आपण स्वतःच तसे वाटून घेत असतो. यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  आपले आयुष्य न तोलता, आपले यश  हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते. तसेच आपले अपयश हे कुणाचेतरी  यश असू शकते. त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका.

४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे. प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. कोणी काहीही बोलले तरी, जर आपला आपल्या कृतीवर विश्वास असेल तर आपण कायम आनंदी राहू शकतो.

५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आह. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील स्थान, समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर आपले कोणावाचून काहीही अडत नाही. दुसर्यांवर प्रेम जरूर करावे पण त्या आधी स्वतःवर प्रेम करावे.

६)  आपण जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा, संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका. कारण आयुष्य अजून संपलेले नाही.  दुसर्यांच्या चुका तर आपण नेहमीच माफ करतो. कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा. जर आपण स्वतःला स्वीकारले तरच जग आपोआप स्वीकारेल.

७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात. त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा. दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका.

८) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते. अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका. कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार करा. आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी मानसिक संतुलन महत्वाचे असते.

९) दुसऱ्या व्यक्तीच्या  विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर आपला ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने  बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो. परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर आपला ताबाच नाही त्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते, तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते. तसंच  अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता आपण कसे वागायचे हे ठरवावे.

१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो. फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे. हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना आपले स्वतःचेच विचार आड येत असतात. एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते. परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा आपल्याकडे परतत नाही.

११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो. मानसिक नाही, आपण  व्यक्तीवर हक्क सांगतो म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगत असतो. त्याच्या मनावर आणि भावनांवर आपण हक्क सांगू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence

छत्रपती शाहू महाराज जयंती