भावनिक बुद्धिमत्ता | Emotional Intelligence | भावनिक बुद्धिमत्ता सुधारता येते का? भावनिक बुद्धिमत्ता ( Emotional Intelligence ) आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो , ज्या अतिशय बुद्धिमान व हुशार असतात , पण आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. अशा विविध घटनांमधून आपणास हे दिसून येते की , ‘ बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे सूत्र हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. भावनिक बुद्धिमत्ता अभ्यासाचे मूळ आपणास डार्विनच्या सिद्धांतामध्ये आढळून येते. भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक असते असे डार्वनिने सर्वप्रथम मांडले होते. अनेक अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की , केवळ बुद्धिमत्ता तपासून एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांची पूर्ण पारख होऊ शकत नाही तर त्यासाठी आणखीन काही गोष्टी
मानसशास्त्र विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. एस. एस. कुरलीकर सोबत श्री.ए.आर. महाजन, मा.शिवाजीराव पाटील, श्रीमती टी.के. पाटील, डॉ.उषा पवार, डॉ.एन.डी.मांगोरे भारतात अनेक राजे होऊन गेले मात्र समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे राजे छत्रपती शाहू महाराज होते.आपला समाज शिक्षणामुळे पाठीमागे आहे हे ओळखून त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक जातीच्या वस्तीगृहाची निर्मिती केली. शेती सिंचनासाठी राधानगरी धरणाची निर्मिती, विज्ञानवादी दृष्टिकोन, सर्वधर्म समभावाची शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांचे हे विचार समाजाला दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन समाजशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. एस. कुरलीकर यांनी केले. श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, मानसशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा